समोर कोरा कागद घेउन बसलोय पण काय लिहु काहि कळत नाहि. आनि का लिहु ते पण कळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा कागद कोरा असतो एवढे मात्र खरे, त्यावर काय लिहिले आहे हे फ़क्त त्यालाच माहीत असते. दुसरे कोणी ते वाचू शकत नाही समजने तर दूरच. मग मीहि हा कागद कोरा ठेवला तर काय बिघडले?
पण काही कागद भरुन पावणार असतात, ह्याच्याहि नशिबात तेच असावे.
काहि शब्द काहि चित्रे
नाहितर अखंड पत्रे
काहि दुभंगलेले क्षण
अपुर्ण राहिलेले पण..
एखादि कहानी
एखादा प्रवास
काहि मनातली गाणी
गावाकडचे पाणी
वेडया-वाकडया रेषा
हरवलेल्या दिशा
कधी काढलेली आठवण
आठवणीतील बालपण
नंतर आलेली तरुणाई
त्यातील प्रत्येक क्षणाची अपुर्वाई
तेव्हाचे खेळ
आता मिळत नसलेला वेळ
ती भेटली तेव्हा..
उंच उडालेले पतंग
मग दोर तुटावी
तशी तुटलेली नाती
एका रात्रीचे वादळ
त्यात अडकलेले झाड
पहाटेची वाट पाहत
एकटाच बसलेलो
मी..
सोडवलेली कोडी काहि
आणी कोडयात अडकलेले
ते दिवस, आताचे दिवस
लिहायला खुप काही आहे पण लिहिने जरूरीचे नाहि. तसा कागद अजुनही कोराच आहे, मी सगळेच काहि लिहिले नाहि.
- समीर पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment